झाली संध्या संदेह माझा गेला

संत एकनाथ महाराज अभंग झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं प्रगटला ॥धृ॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती । असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभव स्नान हें मुक्तस्थिती ॥१॥ सद्बुद्धीचें घालूनि शुद्धासन । वरीं सद्गुरुची दया परिपूर्ण । शमदम विभुती चर्चूनी जाण । वाचें उच्चारी केशव नारायण ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां । भक्ति बहिण धांवूनि आली गांवा । आतां संध्या कैसी करूं मी केधवा ॥३॥ सहज कर्में झालीं तीं ब्रम्हार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन । ऐसें ऐकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निजखूण ॥४॥ 🌼🌺🌸🌷🌹🌷🌸🌺🌼 Watch Video: Click Here